शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

महसूलमंत्र्यांचा कृत्रिम दुधाचा कारखाना: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:33 IST

सांगली : दूध आंदोलनामुळे मुंबईवर काहीच फरक पडणार नाही, असा दावा करणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कृत्रिम दुधाचा कारखाना असावा. या कारखान्यातून ते दुधाचा पुरवठा करणार असतील, अशा शब्दात रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी महसूलमंत्र्यांवर हल्ला चढविला. दूध आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहणार आहे. पण पोलिसांकडून ...

सांगली : दूध आंदोलनामुळे मुंबईवर काहीच फरक पडणार नाही, असा दावा करणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कृत्रिम दुधाचा कारखाना असावा. या कारखान्यातून ते दुधाचा पुरवठा करणार असतील, अशा शब्दात रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी महसूलमंत्र्यांवर हल्ला चढविला. दूध आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहणार आहे. पण पोलिसांकडून उत्पादकांना त्रास दिला जात आहे. या कारवाया थांबवाव्यात, अन्यथा शेतकरी पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला.सांगलीतील अपक्षांच्या आघाडीच्या मेळाव्यासाठी खा. शेट्टी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दूध उत्पादनाचा खर्च ३५ रूपयांपर्यंत असताना, शेतकºयांना ते १७ ते १८ रूपयांना विकावे लागते. पाण्याची बाटलीसुध्दा २० रूपयाला मिळते. यात शेतकºयांचा काय दोष? या लुटीचे उत्तर सरकारने द्यावे. यापुढे आम्ही तोटा सहन करणार नाही. पंढरपूरच्या विठ्ठलाला दुधाचा अभिषेक घालून रात्रीपासून दूध आंदोलनाला सुरूवात होईल. आम्ही मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखणार आहोत. शासनाकडून जर पोलिसांच्या माकड कारवाया थांबल्या नाहीत, तर शेतकरी ते सहन करणार नाहीत. जर कायदा व सुव्यवस्था बिघडली, तर त्याला सरकार जबाबदार असेल.या आंदोलनाचा शहरी लोकांना त्रास होईल. त्याबद्दल मी माफी मागतो. शहरी नागरिकांना दूध हवे असेल तर गावाकडे या, तुम्हाला मोफत दूध देऊ. यानिमित्ताने शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना शेणा-मातीत किती कष्ट करावे लागतात, हेही त्यांना समजेल. त्यांचे दु:ख तुम्ही डोळ्याने बघूनच, शेतकºयांचा संताप योग्य की अयोग्य ते ठरवा. शेतकºयांनी दूध डेअरीमध्ये घालू नये, पण ते रस्त्यावरही ओतू नका. दूध गरिबांना, झोपडपट्टीमध्ये, शाळेत मुलांना, अनाथाश्रमात द्या, चार दिवस मिठाई बनवा, हवी तर तीही गरिबांमध्ये वाटा. लाखो लोक पंढरीच्या वारीत आहेत. ते दूध वारीत पाठवा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.आंदोलन ग्राहकविरोधी नाहीहे आंदोलन ग्राहकांच्या विरोधात नाही. कारण आम्ही दुधाच्या विक्रीचे दर वाढवा असे कधीच म्हटले नाही. दुधाच्या विक्रीवर दुधाच्या खरेदीचे दर ठरत नाहीत. प्लास्टिकच्या पिशवीत केवळ ३५ ते ४० टक्के इतकेच दूध असते. उर्वरित दुधावर प्रक्रिया करून उपपदार्थ बनविलेले असतात. या व्यवसायात मंदी आहे, त्याला केंद्र सरकारचे धोरणच कारणीभूत आहे. ही मागणी जोपर्यंत शासन पूर्ण करीत नाही, तोपर्यंत आमच्यावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. तो आमचा अधिकार आहे, असेही शेट्टी म्हणाले.कंपन्यांसाठी अनुदानतीन रूपयांचे अनुदान हे शासनाचे धोरण नसून पावडर निर्माण करणाºया खासगी कंपन्यांचे आहे. ते १६ रूपयांनी दूध खरेदी करतात, त्यात ३ रुपये देऊन काय उपकार करत नाहीत. त्यांना यापूर्वीच पावडर तयार करण्यासाठी ३ रुपये अनुदान मिळालेले आहे. शिवाय निर्यातीसाठी ५० रुपये अनुदान दिले आहे. यामध्ये त्यांचा आठ रूपयांचा नफाच आहे, असे गणितही शेट्टी यांनी मांडले.